केंद्राने कायदे मंजुर करताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं, पवारांचा सल्ला
मुंबई :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेतलेली भेट यावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की, “शेतकऱ्यांचा ज्या मागण्या आहेत त्या मुख्यत: ३ कृषी कायद्यासंदर्भात आहेत. जेव्हा हे कायदे आले तेव्हा घाईत सरकारने यांना मान्यता दिली. चर्चा न करता मान्य केली आहे. आधी हा कायदा मागे घ्या आणि नंतर यावर विचार करा असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी केंद्र सरकारला दिला आहे. तसेच शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना युपीए अध्यक्षपद, भाजप नेते रावसाहेब अशा अनेक विषयांवर भाष्य केले.
केंद्र सरकारने चर्चेशिवाय कृषी कायदे मंजुर केले. हे कायदे मंजुर करतेवेळेस विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं. असे सांगत शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. शेतकऱ्यांचा मागणीचा सरकारने विचार करायला हवा, असा सल्ला पवारांनी केंद्र सरकारला दिला. दरम्यान, आता शेतकऱ्यांचे हे आंदोलन दिल्लीपुरते सीमित आहे जर तोडगा निघाला नाही तर अन्य ठिकाणी देखील हे पसरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही”.
दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चीन आणि पाकिस्तानच्या केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांना विचारले असता ते असं म्हणाले की, “दानवेंसारख्या लोकांच्या वक्तव्याला काय महत्व द्यायचे आणि काही लोकांना कुठे काय बोलावं याच भान नसतं, असं म्हणत पवारांनी दानवेंना फटकालं आहे. तर, युपीए अध्यक्ष पदाबाबत विचारणा केली असता त्या बातम्या खोट्या”, असल्याचंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!