किरकोळ कारणातून लग्नाच्या वरातीत चाकूने वार, उल्हारनगरमधील घटना
उल्हासनगर : किरकोळ कारणातून एका व्यक्तीवर लग्नाच्या वरातीत चाकूने वार झाल्याची धक्कादायक घटना उल्हारनगरमध्ये समोर आली आहे. आहे. शुक्रवारी (15 जानेवारी) ही घटना घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. रितेश शर्मा असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे
मिळालेल्या माहितीनुसार,उल्हासनगरमध्ये कॅम्प नंबर 3 च्या खेमानी परिसरातून ही वरात विवाहस्थळी जात होती. यावेळी खेमानी येथील रस्त्यावरून ही वरात जात असताना एक दुचाकीस्वार दुचाकी चालवत येत होता. याच वेळी वरातीमधील एका व्यक्तीला दुचाकीची ठोकर लागली. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद झाला.यानंतर काही वेळाने दुचाकीस्वार तिथून निघून गेल्यावर तो आपल्यासोबत सहा ते सात लोकांना घेऊन गेला. यानंतर त्याने वरातीमधील वऱ्हाडयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने जवळ अलेल्या चाकूने रितेश शर्मा त्यांच्यावर वार केली. यात शर्मा त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रितेश हे धुळ्याहून आपल्या मेव्हण्याच्या मुलाच्या लग्नासाठी उल्हासनगरला आले होते.सध्या रितेश शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!