शाळेत असल्यापासूनच्या भांडणाच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला
पुणे : शाळेत असल्यापासूनच्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना येरवड्यातील भाजी मार्केट चित्रा चौक परिसरात 26 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडला.
रोहित राजेंद्र वाघमारे (वय 21) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इस्माईल मैनुद्दीन शेरेकर (वय 18) निखिल कांबळे, प्रथमेश चव्हाण, निखिल यादव,आब्या खंडागळे, चोर पज्या आणि त्याचे इतर दोन ते तीन साथीदारांवर गुन्हे दाखल केले असून आरोपी इस्माईल मैनुद्दीन शेरेकर याला अटकही केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी शाळकरी मित्र आहेत. शाळेत असल्यापासून त्यांच्यात भांडण होत होते. याच भांडणाचा राग धरून फिर्यादी तरुणावर आरोपीने जीवघेणा हल्ला केला. घटनेच्या दिवशी फिर्यादी तरुण हा चित्रा चौक येथे थांबला असताना आरोपींनी बेकायदा जमाव जमून मी त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याचा वार केला. परंतु त्याने तो वार चुकवला आणि तेथून पळाला. त्यानंतर इतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत आरडाओरडा आणि शिवीगाळ केली आणि या परिसरात दहशत निर्माण केली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी इस्माईल मैनुद्दीन शेरेकर याला अटकही केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!