सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा मृतदेह आढळला विहिरीत ; कोपरगाव तालुक्यातील घटना
अहमदनगर : 6 महिन्यापूर्वीच थाटामाटात लग्न लावून दिलेल्या युवतीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला आहे.ही धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील पढेगाव परिसरात गुरुवारी (दि. 3) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु असतानाच तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप माहरेच्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसानी चहूबाजूंनी तपास सुरु केला आहे.
पुजा सागर मापारी (वय 24) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजाचे लग्न 6 महिन्यांपूर्वीच झाले होते..लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे..पैशाची मागणी करत तिच्यावर अनेकदा मानसिक अन् शरीरिक छळ झाल्याची तक्रारही तिच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. तसेच आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप माहरेच्यांनी केला आहे. या प्रकरणी आरोपींना तातडीने शिक्षा करावी, अशी मागणी पूजाच्या नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पूजाच्या सासरच्या काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव करत आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!