नात्यातील मुलीला पळवून नेल्याच्या रागातून ६ वर्षांनी तरुणावर खुनी हल्ला
पिंपरी चिंचवड : नात्यातील मुलीला एका तरुणाने पळवून नेले. या रागातून दोघांनी मिळून सहा वर्षानंतर तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील च-होली खुर्द येथे घडली.
राम चंद्रकांत कांबळे (वय 28) तसेच जखमी तरुणाचे नाव आहे या प्रकरणी हनुमंत चंद्रकांत कांबळे (वय 38 रा च-होली खुर्द, ता खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार नरसिंग गायकवाड मारुती जाधव (दोघे.रा.च-होली खुर्द, ता खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लहान भाऊ राम कांबळे याने सहा वर्षांपूर्वी ज्योती भानुदास गायकवाड यांच्या सोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून तिला पळवून नेले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. सहा वर्षानंतर फिर्यादी यांच्या चुलत मामाचा मुलगा नरसिंग गायकवाड आणि मावशीचा मुलगा मारुती जाधव यांनी फिर्यादी यांच्या भावाला कोणत्यातरी
हत्याराने डोक्यावर, दोन्ही कानावर, गालावर, कपाळावर मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना
अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!