• December 17, 2024
  • No Comment

आयुष्मान कार्ड’ तयार : गरीब व गंभीर आजाराच्या रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

आयुष्मान कार्ड’ तयार : गरीब व गंभीर आजाराच्या रुग्णांना मिळणार मोठा दिलासा

    आयुष्मान भारत कार्ड असेल त्यांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. राज्यातील सहा विभागातील नऊ कोटी ६४ लाख ७८ हजार ५५० पात्र नागरिकांपैकी तीन डिसेंबरपर्यंत राज्यात दोन कोटी ९० लाख ७१ हजार ६२४ नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड काढले आहे.

    त्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. अद्याप सहा कोटी ७४ लाख सहा हजार ९२६ नागरिकांनी कार्ड काढले नाही.

    ‘आयुष्मान भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या एकच आहेत. समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत दर्जेदार व उत्तम आरोग्य सुविधा पोहोचविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र शासन आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबवत आहे. २०१८ मध्ये ही योजना सुरू झाली. या कार्डधारकाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. या योजनेमध्ये एक हजार ३५६ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार होतात.

    राज्यात आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी एकूण सहा विभाग आहेत. यात नाशिक, पुणे, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती यांचा समावेश आहे. यात सर्वाधिक कार्ड पुणे विभागातून काढले आहेत. पुणे विभागाला एक कोटी ९६ लाख १७ हजार ७५२ नागरिकांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ५८ लाख ९२ हजार ५७७ नागरिकांनी कार्ड काढले आहे. तर अमरावती विभागाला एक कोटी ३६ लाख ९५ हजार ८० नागरिकांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३५ लाख सात हजार ८६४ नागरिकांनी हे कार्ड काढले आहे. ही संख्या इतर विभागापैकी सर्वात कमी आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *