• January 3, 2025
  • No Comment

तोतया पीएसआयने महिलेला १५ लाखाला घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

तोतया पीएसआयने महिलेला १५ लाखाला घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पिंपरी: टेलिकॉम डिपार्टमेंटमधील प्रतिनिधी आणि पोलिस असल्याचे भासवून एका महिलेच्या नावाने मनी लॉन्डरिंग झाल्याचे सांगत महिलेची १५ लाख २५ हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत वाकड येथे घडली.

    याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक अज्ञात व्यक्ती आणि पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादी महिलेला फोन करून ती टेलिकॉम डिपार्टमेंट ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाने सिम कार्ड खरेदी करून १५ ते २० लोकांना बेकायदेशीर मेसेज पाठवण्यात आले आहेत. तसेच त्या सिम कार्डचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी केला आहे. त्याबाबत टिळकनगर पोलिस ठाणे, मुंबई आणि अंधेरी पोलिस ठाणे, मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले. पोलिस उपनिरीक्षक हेमराज कोळी असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या खात्यावरून २५ कोटींचे व्यवहार झाले असल्याचे खोटे सांगितले. फिर्यादीकडून १५ लाख २५ हजार रुपये पाठवण्यास सांगून त्यांची फसवणूक केली.

    पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *