• March 16, 2025
  • No Comment

पुणे: धुलवडीला 402 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई ! 386 वाहने जप्त, एकाच दिवसात लाखोंचा दंड

पुणे: धुलवडीला 402 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई ! 386 वाहने जप्त, एकाच दिवसात लाखोंचा दंड

    पुणे: होळी आणि धुलीवंदन साजरा करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करु नये, यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यात मद्यपान करुन वाहन चालवणार्‍या ४०२ तळीमारांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली.

    एकूण ६ हजार ११८ केसेस करण्यात येऊन त्यांच्यावर ५० लाख ९४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे होळीचा सण आनंदी, सुरक्षित साजरा करता यावा, या करीता शहरातील बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी १४ मार्च रोजी विशेष मोहिम आखण्यात आली होती. त्यात ९० ठिकाणी नाकाबंद करण्यात आली़ तेथे वाहनांची तपासणी केली गेली.

    शहरामधील एकूण ३७ वाहतूक विभाग व संबंधित पोलीस ठाण्याकडून लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर ट्रिपल सिट, राँग साईड, ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या कारवाई अंतर्गत ३८६ वाहने जप्त करुन एकूण ६ हजार ११८ केसेस करण्यात आल्या. त्यांच्यावर एकूण ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

    एकूण केसेस – ६११८

    एकूण दंडात्मक रक्कम – ५०९४००० रुपये

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *