
नुकतीच घर वापसी केलेली सायली सुर्वे हिचे अपहरण की हत्या
- क्राईम
- April 6, 2026
- No Comment
पुणे: नुकतीच घर वापसी करून आलेली हिंदू युवती सायली सुर्वे हिचे तिचा माझी पती आतिफ तासे यांनी अपहरण केलेले आहे. तिचा ठाव ठिकाणाह लागत नाही तिच्यावर प्रचंड दबाव टाकून तिला केस मागे घेण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. असे तिच्या आईचं म्हणणं आहे. आणि सायली सुर्वेला प्रचंड मारहाण होण्याची किंवा तिच्या खून करण्याची सुद्धा शक्यता आहे. कृपया ताबडतोब याबाबत महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, जर याबाबतीत काही विपरीत घडलं तर महाराष्ट्रच्या दृष्टीने ते अतिशय निराशा जनक परिस्थिती असेल. असे बोलताना मिलिंद एकबोटे यांनी सांगितले आहे.
मोहम्मद आतीफ या तरुणाशी तिने प्रेमविवाह केला होता. पण लग्नाच्या १० वर्षानंतर तिने सगळे अन्याय आणि छळ सांगत हिंदू धर्मात घरवापसी केली होती.
सायली सुर्वेने २०१९ मध्ये मीरा भाईंदर येथील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे यांच्यासोबत घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. या विवाहानंतर सायलीचे नाव बदलून अतेजा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र लग्नानंतर आपला सतत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, तसेच आपले धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप सायलीने केला आहे.
व अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या माध्यमातूनच आपले शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आल्याचे सायलीने सांगितले होते. पिंपरी चिंचवडमधील सायलीला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी धार्मिक विधींसह शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती, यामध्ये होम-हवन, मंत्रोच्चार आणि इतर धार्मिक विधी करण्यात आले होते.




